उदास वाटायला लागलं की 'श्रीहरी' चं दास व्हायचं
कंटाळवाणं वाटायला लागलं की, पोथी, पुस्तक वाचायचं
कमकुवतपणा वाटायला लागला की प्रार्थना करायची
धीर धरला की फळं मिळतात, मग जिद्दच का सोडायची
धूर कोंदटला की आपण नाही का दूर पळत जातो
घास शिळा आंबूस झाला की आपण टाकूनच देतो
अनुभवातनंच तर खूप काही शिकायला मिळतं
पाय घट्ट रोवून उभं राहिलं की जगायचं कसं, कळतं
'सर सलामत तो पगडी पचास' कधी ऐकलं असशील ना
वार चुकवलेच नाही तर फटकेच खात बसशील ना
मुंगी होऊन साखर खावी, माशी होऊन मध साठवावं
धाकटं व्हावं, निगरगट्ट व्हावं, गोड बोलून साधून घ्यावं
कळला का सुखाचा मंत्र तुला, पडली का गालावर खळी
हसत हसत सामोरं जायचं, हसलीस ना, आता दे टाळी
पुन्हा एकदा..
येडं म्हण, गधडं म्हण, पद्या म्हण, पॅडी म्हण.
उगाच कुणी वाटी गेलं तर मात्र .. दे दणादण.
पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे
दिनांक : 30 जानेवारी 2023
No comments:
Post a Comment