कटू आठवणींना अडगळीतच ढकलायचं असतं
उगाच नुसतं दु:ख उगाळत कधी बसायचं नसतं
सुखद वारा, वावटळ घेऊन आला तर, गोंधळायचं नसतं
देव नेहमीच परीक्षा पहात असतो, आपण सज्ज रहायचं असतं
सुखाचे शब्द दृष्टावतही येतात, दुर्लक्षित करायचे असतात
खवचट बोलणे, टिकेचे टोमणे विसरूनच जायचे असतात
प्रेमाची, मदतीला धावून येणारी माणसं बांधून ठेवायची
कटकट्या, टवाळी करणाऱ्यांची दखल तरी का घ्यायची
वाट आपली, जगणं आपलं, कष्ट आपले, समस्या आपल्या,
बघून घ्यायच्या आपणच आपल्या
का सहन करायच्या टपल्या
म्हणतात ना, 'मान सांगावा जनात
अपमान ठेवावा मनात'
'आपलीही वेळ येतेच की', हेच तर राहू द्यायचे ध्यानात.
शक्यतो वर्तनानं, बोलण्यानं आपण कधी चुकायचं नसतं
झालीच चूक, क्षमा मागून, प्रकरण मिटवून टाकायचं असतं
उन्हाळी पावसाळी हिवाळी, जसे ऋतु निसर्गाचे
रात्री नंतर दिवस जसा, नियम असेच जगायचे
अजून खूप काही....
Yours पॅडी.
पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे
30 जानेवारी 2023
No comments:
Post a Comment